Posts

Showing posts from August, 2020

कठीण समय येता...

  प्रिय, नुकताच एक forwarded मेसेज वाचण्यात आला. शब्दशः सांगत नाही बसत, 2020 हे वर्ष आयुष्यातून डिलीट करण्याबद्दल होता. वाईट आहेच परिस्थिती अर्थात. 100 वर्षात एकदा येणारी situation! खूप काही सोसावं लागत आहे आपल्याला. नको नको झालं आहे आता इतिहासाचे साक्षीदार आणि भागीदार बनणं. पण म्हणून सरळ अख्ख वर्ष वजा करायचं? सततच्या गोड जेवणाने ही कधी मळमळ होते. तिखट, आंबट, तुरट अगदी कडू सुद्धा हवंच असतं की आहार संपूर्ण व्हायला. नुसत्या जेवणातच नाही, आपलं प्रचंड प्रेम असतं अशा आई वडिलांपासून ते नवरा बायको वा भावंडं किंवा प्रियकर प्रेयसी अशा सगळ्या नात्यांमध्ये तरी कुठे सगळं फक्त गोग्गोड असतं? म्हणून माणसं तोडून नाही टाकत आपण. सगळ्यांच्या सोबतीने जगतो आणि त्यामुळेच आठवणी तयार होतात. आयुष्याचंही तेच आहे. ‘कोलाज’च तर असतं ते एक. वेगवेगळ्या भावनांचं, प्रसंगांचं. ‘जगायचं’ असं एकदा ठरलं ना, मग एकसूरी कशाला मागायचं? ‘Colourful life’ हवं म्हणताना एकाच रंगाची अपेक्षा तर नाही करत आपण. धमाल, excitement, आनंद, समाधान, निराशा, हतबलता, असूया सगळं हवं... प्रसंग चांगला असला त...

सोय.. सवय.. संयम

  प्रिय, खूप वर्षांनी एका मैत्रिणीची पुन्हा भेट झाली... अर्थात virtual भेट. तिने जुना ग्रुप फोटो पोस्ट केला, त्याचवेळी ‘घने बादल के कारण’ network issue झाला. तो फोटो download होईपर्यंत जणू अस्वस्थ च वाटायला लागलं. कधी एकदाचा download होतो असं झालं. त्यावेळी उत्सुकतेपेक्षा download का होत नाही याची घाई जास्त होती. आणि अचानक क्लिक झालं, केवळ एका इमेज बद्दल नाही हे. अपेक्षित असलेला reply येईपर्यंत चारदा मोबाइल चेक केला जातोय. तेवढ्या वेळेपूरतं सगळं थांबतं जणू. कधी काळी ख्याली खुशाली कळवायला, पत्र लिहून उत्तराची महिनोमहिने वाट पाहणारी मी, क्षणाचाही विलंब नको म्हणते आहे. सवयी बदलून गेल्या सगळ्या. नव्या अंगवळणी पडल्या. असं फक्त माझंच नसेल ना झालं? लहानपणी टीव्ही वरच्या इन मीन दोन चॅनेल्स पैकी दुसरं पाहायचं झालं किंवा आवाज कमी जास्त करायचा म्हंटलं की उठून टीव्हीची बटणं फिरवावी लागायची. त्यातही काही आवडीचं नसेल तर ते लागेपर्यंत वाट पाहायची! आता? रिमोट! आवडीचं काही नसेल तर शेकडो पर्याय एक क्लिक वर. रिमोटपण केवळ टीव्ही साठीच नाही बरं... फॅन, लाइट. सगळं बसल्या जागी operate करा...

मैत्र

प्रिय, मैत्री दिनाच्या शुभेच्छा! बालपण ते वयाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत जगण्यासाठी, तग धरण्यासाठी जर कुठली भावना हात देत असेल तर ती मैत्री. जगात सर्वसुखी कुणी आहे की नाही माहीत नाही मात्र ‘ज्याला मित्र नाही’ असा विरळाच. किती काय देते मैत्री! लहानपणी घरच्यांचा आदर आणि धाक असल्याने करता न येणाऱ्या चिडणे, ओरडणे, भांडणे, कधी दादागिरी तर कधी झुकते माप घेणे, चीटिंग आणि प्रामाणिकपणा अशा अनेक गोष्टी मित्रांच्या सोबत सहज अनुभवतो आपण. आणि हळूहळू समाजात राहण्याच्या दृष्टीनेही तयार होतो. राहत्या ठिकाणी, शाळेत, कॉलेज मध्ये मित्र मैत्रीण म्हणजे ‘सोनेरी क्षणांचे सोबती’ असतात. शब्दात मांडता मावत नाहीत मैत्रीचे गोडवे. एक किंवा दोनची संख्या मैत्रीच्या बाबतीत थोतांड वाटते मला. कारण मैत्री प्रत्येकाच्या बाबतीत काही वेगळं घेऊन येते. सगळ्यांचीच. शाळेतल्या मैत्रिणी आणि लग्नानंतर झालेला सोसायटी मधला ग्रुप यांच्यात तुलना होऊच शकत नाही. आणि तरी दोन्हीकडच्या मैत्रिणींमध्ये रमतोच की आपण. कॉलेज मधला मित्र मैत्रिणींचा घोळका दोन दशकांनी भेटला तर तेव्हा कुठे आपण आधीसारखे उरलेले असतो? आणि आठवतो म...