Posts

Showing posts from June, 2020

मन तरंग

प्रिय, मस्त पावसाला सुरुवात झाली की ‘खमंग भजी आणि वाफाळता चहा’ हा बेत झाला नाही, असं होणारच नाही. हो ना? मात्र घरी कितीही घाट घातला तरी ‘पावसाळी घाटातल्या’, गाडीवरच्या ह्याच बेताची आठवण सतावते. काय कनेक्शन असतं काही गोष्टींमध्ये! सांगून समजत नाही. पण असतं एवढं नक्की. तसंच कळण्यापलिकडचं काही अधूनमधून डोकावत रहातं. वाहावत घेऊन जातं आपल्याला सोबत. मग ते एखादं गाणं असो की पदार्थ! कुठच्या कुठे कनेक्ट करतं आपल्याला! बरं त्या गोष्टी फार काव्यात्मकच असायला हव्यात असंही नाही. म्हणजे उदाहरणार्थ, माझं होतं असं काही वेळा, बाजारात फिरताना एखाद्या दुकानासमोरून जाताना तिथल्या अगरबत्तीचा सुगंध नाकाशी दरवळतो आणि क्षणात आजोळच्या वाड्याशी तार जुळते. कुळथाच्या पीठिचा वास म्हणजे चाळीतल्या कुडकर आजींच्या घरातून येणारा चविष्ट सुगंध. गावठी तुपाचा चमचा जिभेवर टेकवताच विक्रोळीच्या कन्नमवार नगर मधली शम्मी अंकल कडची डिनर सेटची प्लेट आणि डोसा दिसायला लागतो. या जोडण्या कधी होतात कुणास ठावूक. लहानपणी कधीतरी बसलेले असतात हे सुगंध आणि चवी नाकात. विक्रोळीला आम्ही राहत असतानाचा काळ म्हणजे माझं वय वर्ष दोन केवळ. तरी पस्...

सुट्टी संपताना......

प्रिय, सुट्टी संपताना...... सुट्टी सुरु झाल्याचा आनंद पुरेसा   घेत   नाही   तर ती संपायच्या मार्गावर आलीय ह्याचं   काउन्ट   डाउन सुरु होतं . शाळा सकाळची असली तर   पिल्लांना सक्काळी सक्काळी उठवायचं आणि दुपारची   असली तर वामकुक्षीची   सवय मोडायचं पाहिलं टेन्शन येतं   आयांना. टिफिन , अभ्यास   (दरवर्षी वाढलेला ) , वेण्याफन्या   या सगळ्यातून एक ब्रेक असते सुट्टी . पण   खरं   दुःख   रोजची धावपळ पुन्हा सुरु   होणार याचं   नसतं . या काही दिवसांच्या ब्रेक मध्ये आईच्या कुशीतल्या पिल्लाची यत्ता वाढणार असते , आणि ते मोठं होणार असतं .   एकेक वर्ग पुढे जाण्याच्या जोडीला एकेक वर्ष हातातून निसटत असतं . बोबड्या बोलातली   बडबडगीते   कधी स्पष्ट शब्दातल्या   पोएम्स नी   आणि   मग   कधीतरी अचानक शाब्दिक स्पष्टोक्तीने   रिप्लेस होतात ...लक्षातही येत नाही. सुट्टी   लहानपण   अन   मोठेपणातला दुआ होऊन जाते   आणि   "सुट्टीत रिकामा वेळ मिळतो थोडा "   असं ...

फादर'स् डे स्पेशल

प्रिय, Happy Father’s Day to all. आपापल्या परीने सगळ्यांचं व्यक्त करून झालं असेल नाही का? मीही केलं. आई च्या मानाने कित्येक वर्ष बाबा जरा दुर्लक्षिले गेले प्रेम व्यक्त करण्याच्या बाबतीत. सगळ्यांकडूनच. एकीकडे बाबाही बदलले म्हणा काळासोबत! आपल्या आजोबांच्या काळात म्हणे वडिलांना ‘मुलं कोणत्या इयत्तेत आहेत’ हेही माहीत नसायचं आणि कुणाला त्यात काही वावगं पण नाही वाटायचं. प्रपंच म्हणजे जबाबदारी असं काहीसं गणित असावं.  वडिलांचा दरारा आणि धाक, शिस्त यासोबत आपले पालक मोठे झाले असावेत असं एकंदर चित्र येतं नजरेसमोर. मनात प्रेम असणारच, मात्र एका हाताच्या अंतरावरून जेवढं आणि जसं पोहोचेल तसं झिरपलं असेल. म्हणून ते कमी ठरत नसलं तरी अव्यक्त मात्र राहिलं काही अंशी. आपले पालक त्या भूमिकेत आले तोपर्यंत ‘पालकत्व’ हा शब्द रूढ झाला नसला तरी सजग वडील नक्कीच वाट्याला आले असावेत सगळ्यांच्या. मुलांची पण तर संख्या कमी झाली ना तोपर्यंत! लाड करण्यामध्ये आणि त्याच बरोबर संस्कार, मूल्य रुजवण्यामध्ये आई च्या बरोबरीने बाबासुद्धा सहभागी होते. लेकासोबत लेकीच्याही करियर मध्ये interest घेणारे, मुलांना प्रोत्साहन ...

एक असते शाळा...

प्रिय सख्यानो, जून महिना आला की कोण धावपळ सुरू होते नाही का आपली सगळ्यांचीच. पावसाळा तोंडावर असतो आणि त्यात शाळा, कॉलेज सुरू होणार म्हंटल्यावर खरेदीला उधाण येतं. यावर्षी चित्र थोडं बदललेलं दिसू शकेल. एरवी ‘नेमेची येतो पावसाळा’ मातीचा आणि कोऱ्या पुस्तकांचा सुगंध घेऊन! त्या सुगंधा सोबत मी तर जाऊनच बसते माझ्या शाळेच्या बाकावर. माझी शाळा... शारदा मंदिर. फडणीसांच्या वाड्यात भरणारी. आणि नंतर मोठ्या मैदानाच्या मोठ्या इमारतीत शिफ्ट झालेली. वाड्याचा चेहरामोहरा पार बदलून गेला असला (त्याजागी आता रहिवासी इमारत आहे.) तरी माझ्या मनात जशीच्या तशी आहे शाळा. डोळे मिटले की ‘वाड्यात भरणारी शाळा’ आणि ‘शाळेत वसलेला वाडा’ दोन्ही जिवंत होतात. मनाने सगळीकडे फेरी मारून येते मी काही सेकंदात. चौथीपर्यंत वर्गात बसायला एखाद्या वर्षी बाक तर एखाद्या वर्षी सतरंजी. पाचवीला मोठ्या इमारतीत गेल्यावर मात्र चंगळ होती... दरवर्षी बाकच! शाळेच्या दोन्ही वास्तू बालपणापासून टीन एज पर्यंतच्या माझ्या आठवणींचा अविभाज्य भाग आहेत. माझ्याच कशाला तुम्हा सगळ्यांचंही असंच असेल नाही का? नावं काय ती बदलतात शाळेची आणि आपली. किती काय देते श...

होतं ना असं कधी कधी

प्रिय सखी, होतं ना असं कधीकधी , गर्दीमध्ये नजरेसमोरून जातो एखादा परिचित चेहरा आणि सोबत तरळून जातं   विस्मरणात गेलेलं बरंच काही. शाळेच्या बाकावर , कॉलेज च्या कट्ट्यावर , रोजच्या प्रवासात किंवा कदाचित ऑफिस च्या गप्पांमध्ये मनीच्या गुजगोष्टी जिच्यासोबत वाटून घेतल्या तो तेव्हाचा रोजचाच   चेहरा की हा! मधली काही वर्ष वाऱ्यासारखी   उडून गेलेली असतात.खूप सारे नवे चेहरे , नव्या ओळखी जवळच्या वाटायला लागलेल्या असतात , जवळच्या झालेल्या असतात. ' आज ' कुणीतरी वेगळं असतं   शेरिंगसाठी . ' आज ' च्या तिला कळलेली मी खरीच असते.पण म्हणून ' काल च्या तिलाही भावलेली मी खोटी नसते. आणि तरीही दोघींसाठी ' मी ' काही वेगळीच उरते . तेवढंच वेगळं असतं माझं नातंसुद्धा ,  दोघींशी. तेवढंच प्रामाणिक ! बरं केवळ   दोघीच नसतात हं या यादीत. अनेक चेहरे सामील असतात   ...नकळत एकाच वेळी. आज ' काल ' सारखं   काही नसलं आमच्यात तरी जगल्या   क्षणांची देणी मात्र लागतात एकमेकींना. गुलझार साहेब इजाजत मध्ये म्हणतात ते   ' कुछ सामान ' प्रत्येकीकडे देऊन ठेवलेलं आणि सोबतही आणलेलं अ...

ये घर बहुत हसीन है

प्रिय सख्यानो, ‘वाढता वाढता वाढे,लॉक डाऊन काही संपेना’ अशी आपली गत झाली आहे नाही का. कसं वाटतं आहे मग घरात? हेच ते घर बरं ज्यासाठी म्हंटल जातं... घर पाहावं बांधून! ह्याच घरासाठी तर सगळा आटापिटा असतो आपला. चांगलं शिक्षण, नोकरी, प्रवास, भरघोस पगार.. जेणेकरून ईएमआय भरताना हात आखडता नको राहायला. बरं मालकीचच हवं असं नाही, मात्र घर हवंच.   डोक्यावर छप्पर नको का! (खूप लोकं आहेत ज्यांना हेही दुरापास्त!) आपल्याकडे असणाऱ्या छोट्या, मोठ्या, टापटीप अथवा अस्ताव्यस्त कशाही ‘घर’ नामक वास्तूत विसावलो आहोत आपण. किती उबदार, सुरक्षित असं feeling आहे हे! उगाच नाही जीवाची पर्वा न करता लाखोंची घरवापसी होतेय . बघा न, चार दिवस कुठे फिरून आलो तरी घरी परतलं की जे आपलेपण वाटतं त्याला तोड नाही. कोण असतं तसं पाहिलं तर स्वागताला! तर घर बोलतं आपल्याशी. ऐकलं पाहिजे फक्त. घरात असतो तेव्हा घर गृहीत धरलेलं रहातं. थोडं दूर गेलो की त्याच्या आठवणींनी व्याकूळ व्हायला होतं. घरं बदलती असली काही कारणांनी तरी त्या त्या घराशी नाळ जोडलेली रहाते. आयुष्याचा तेवढा भाग तिथे व्यतीत केलेला असतो ना. अदृश्य बंध उरतो आपल्यात. ...

फिर जीत जाएगा इंडिया

प्रिय सख्यांनो , पत्रास कारण .... I mean, गप्पांना कारण की सध्या आपण lock down मध्ये आहोत! कोरोना च्या दहशतीमुळे आपण गेले दोन महिने स्वतःच्या घरांमध्ये अक्षरशः कोंडले गेलो आहोत. कसल्या कमालीच्या गोंधळात होतो नाही का सगळेच आपण! सुरळीत सगळं सुरु ठेवायचं म्हंटल तरी प्रश्न! भीती होती. अज्ञान होतं. आणि अफवा तर होत्याच होत्या! बघता बघता एखादा झोंबी पट सुरु असल्यासारखं वातावरण वाटायला लागलं सगळीकडे. बरं हे काही एका शहरापुरतं किंवा राज्यापुरतं   किंवा त्याही पुढे जाऊन एखाद्या देशापुरतं पण नव्हतं. अख्खं जग कोरोना ने झपाटून जाताना दिसत होतं. विदेशातले अनेक देश बांधव काळजीपोटी व्हिडीओ बनवून पाठवत होते. आणि सगळं समजून घेत आपणही हळूहळू रुळायचा प्रयत्न करत होतो. किती काही बदललं नाही या काळात! Lock down सुरु झालं आणि ते सुरु झाल्याझाल्या ‘माझा lock down चा अनुभव’ यावर आधारित निबंधांची स्पर्धा सुरु झाली. मागे वळून पाहताना वाटतं ‘१५/२० दिवसांत बरंच काही अनुभवलं’ असं वाटून आपण त्यात सहभागी झालो. तसं पाहिलं तर आता खऱ्या अर्थाने सगळ्यांच्या च lock down अनुभवात भर पडलेली आहे. किती...

एक सुरुवात अशीही ...

नमस्कार सख्यांनो , सख्यांनो म्हणजे त्यात सखे-सख्या सगळेच आले हो! माझं नाव सायली. काही जणांसाठी हर्षदा. सायली काय आणि हर्षदा काय. नावात काय आहे ? तर माझ्या दोन्ही नावांत मी आहे. मी कोण ? कोहम ? तसा गहन प्रश्न! थोरामोठ्यांना सुद्धा सुटला असेलच असं नाही. म्हणून सध्या मी...मीच आहे. म्हणजे मुलगी, बायको, बहिण , आई , मैत्रीण या आणि अशा अनेक नात्यांमधून उरते ती मी! आपण सगळेच तर उरतो असे. आणि म्हणून अशा ‘मी’ कडून तुमच्यातल्या ‘तू’ साठी सहज मनातलं काही मांडावस वाटलं. मूल जन्माला आल्यानंतर साधारणपणे दोनेक वर्षांत निदान बोबडे बोल बोलू लागतं. माझ्या बाबतीत दोन वर्षांची होऊन गेल्यावरही केवळ ‘आई ’ हाच शब्द काय तो तोंडी रुळला होता. डॉक्टर म्हणाले, “आई म्हणतेय ना, मग बोलेल हळू हळू.” आणि अहो आश्चर्यम् ‘बोलते कि नाही’ असा संभ्रम निर्माण करणारी ती मी ... एकदा बोलायला लागले आणि ‘थांबते का आता!” पर्यंतचा पल्ला गाठला. मला आठवतं, थोडी बऱ्यापैकी बडबड करून झाली कि मी पप्पांना विचारायचे , “कंटाळा आला का पप्पा ? ” सोबत डझनभर माणस असली तरी कुठल्या न कुठल्या निमित्ताने तोंडाची टकळी चालू ठेवणे हे जणू...